Vasundhara Sathi Sanman : ‘गेली ३० ते ३५ वर्ष सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून मी काम करत आहे. मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘एमपीसीबी’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे आभार मानतो. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला देण्यात आला याचा मला आनंद आहे. हा पुरस्कार माझा नसून सर्व सहकाऱ्यांचा आहे. माझ्या कुटुंबीयांचा आहे,’ असेही काटदरे म्हणाले.
म.टा.खास प्रतिनीधी, मुंबई : ‘आज आपण सर्वजण म्हणतो आहोत की, संपन्न भारतवर्ष आपणास बघायचे आहे. परंतु, ते आपणाला असेच मिळणार नाही. त्याकरिता आपणाला निसर्ग आणि पर्यावरणाचे संतुलन ठेवले पाहिजे. निसर्ग संवर्धनासाठी सर्वांनी पुढे या आणि संपन्न भारतवर्षाचे स्वप्न साकार होईल यासाठी प्रयत्न करू या,’ असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून प्राणी, पक्षी आणि समुद्री कासवाचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करणारे विश्वास तथा भाऊ काटदरे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते काटदरे यांना मंगळवारी मटा सन्मान २०२५च्या ‘वसुंधरा साथी सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ‘पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत, मटा सन्मान २०२५ पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद उपक्रम को-पॉवर्ड बाय सारस्वत बँक आणि विहंग ग्रुप’ या सोहळ्यामध्ये काटदरे यांनी निसर्गाचे संतुलन राखण्याचा मोलाचा सल्ला दिला. ‘वसुंधरा साथी सन्मान’हा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे संयुक्तपणे देण्यात आला.
Vasundhara Sathi Sanman : ‘गेली ३० ते ३५ वर्ष सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून मी काम करत आहे. मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘एमपीसीबी’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे आभार मानतो. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला देण्यात आला याचा मला आनंद आहे. हा पुरस्कार माझा नसून सर्व सहकाऱ्यांचा आहे. माझ्या कुटुंबीयांचा आहे,’ असेही काटदरे म्हणाले.
म.टा.खास प्रतिनीधी, मुंबई : ‘आज आपण सर्वजण म्हणतो आहोत की, संपन्न भारतवर्ष आपणास बघायचे आहे. परंतु, ते आपणाला असेच मिळणार नाही. त्याकरिता आपणाला निसर्ग आणि पर्यावरणाचे संतुलन ठेवले पाहिजे. निसर्ग संवर्धनासाठी सर्वांनी पुढे या आणि संपन्न भारतवर्षाचे स्वप्न साकार होईल यासाठी प्रयत्न करू या,’ असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून प्राणी, पक्षी आणि समुद्री कासवाचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करणारे विश्वास तथा भाऊ काटदरे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते काटदरे यांना मंगळवारी मटा सन्मान २०२५च्या ‘वसुंधरा साथी सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ‘पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत, मटा सन्मान २०२५ पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद उपक्रम को-पॉवर्ड बाय सारस्वत बँक आणि विहंग ग्रुप’ या सोहळ्यामध्ये काटदरे यांनी निसर्गाचे संतुलन राखण्याचा मोलाचा सल्ला दिला. ‘वसुंधरा साथी सन्मान’हा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे संयुक्तपणे देण्यात आला.